ब्रेकिंग
Trending

अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून नागरिकांना सावधानतेचा इशारा

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -25/07/2023


सविस्तर माहिती -अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, अहमदनगर जिल्हयात आजपावेतो 128.6 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

सरासरी पर्जन्याच्या 28.70% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. दि. 25/07/2023
रोजी दुपारी 03.00 वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या विविध नद्यांस खालीलप्रमाणे विसर्ग आहेत.
सुरु
नदीचे नाव
प्रवरा- भंडारदरा धरण -5,515
गोदावरी- नांदुर मध्यमेश्वर धरण-7,190
भिमा-दौंड पुल
विसर्ग (क्युसेक
28,642

भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सुचनानुसार दि. 25/07/2023 ते दि. 26/07/2023 या कालावधीत
अहमदनगर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता
वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व
नाशिक जिल्हयातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाव्दारे
सोडण्यात येणा-या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तरी उपरोक्त नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेचा
इशारा देण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि,
स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्थळी
स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी
नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील
पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/ मोडकळीस आलेल्या व
धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते.
त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट
रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी
घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका
उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना
होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीक चे तहसील
कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर
येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे