समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करतांना बस नदीत कोसळली 13 प्रवाशांचा मृत्यू.बचाव कार्यासठी NDRF दाखल.

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक- 18/07/2022
समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करतांना बस नदीत कोसळली 13 प्रवाशांचा मृत्यू.बचाव कार्यासठी NDRF दाखल.
सविस्तर माहिती- नदीत पडलेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असून , ही बस सकाळी इंदौरहून पुण्याला निघाली होती . अपघातापूर्वी बसने खलघाट येथे 10 मिनिटांचा ब्रेक घेतला होता , त्यानंतर ती सकाळी 10:45 वाजता नर्मदा नदीत पडली . समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनाला वाचवताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले . त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळली.जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने धामनोद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे . घटनास्थळी धामनोद पोलीस व खालटाका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोताखोर व परिसरातील नागरिक बचावकार्यात गुंतले आहेत , बसमधील प्रवाशांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही . धार – खरगोन सीमेवर अपघातातील बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी होते . त्यापैकी 13 प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.तसेच 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. बचाव कार्य चालू असुन. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे . बस इंदूरहून पुण्याला जात होती 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे गोताखोरांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महाराष्ट्र रोडवेजची बस पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली
 धार – खरगोन सीमेवर अपघातातील बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी होते . त्यापैकी 13 प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.तसेच 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. बचाव कार्य चालू असुन. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे . बस इंदूरहून पुण्याला जात होती 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे गोताखोरांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महाराष्ट्र रोडवेजची बस पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली  . या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले . यात बसचा चक्काचूर झाला . अपघातातून बचावलेले प्रवासी यांनी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत केले . तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले . या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे , याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल . तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.
. या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले . यात बसचा चक्काचूर झाला . अपघातातून बचावलेले प्रवासी यांनी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत केले . तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले . या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे , याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल . तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.
 
				 
					 
						


